दिल्ली : मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला फुलं वाहत असतानाचा फोटो ट्विटरवर शेअर करत आज पंतप्रधान नरेंद मोदी यांनी, “राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचं नाव बदलून ते ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ केलं असल्याचं जाहीर केलं. “खेलरत्न पुरस्काराला ‘मेजर ध्यानचंद’ यांचं नाव असावं, अशी मागणी देशभरातून केली जात होती. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, त्यांच्या नावाने देणं हाच उचित सन्मान आहे”, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views.
Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award!
Jai Hind! pic.twitter.com/zbStlMNHdq
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
त्यानंतर आता या मुद्द्यावरून देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, काँग्रेसने यावर आक्षेप घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी, “भाजप देशाला नवीन काही देणार आहे का? की फक्त युपीएच्या काळात राबवलेल्या योजनांची, शहरांची नावं बदलत राहणार? भाजपचे जिथे जिथे आहे किंवा त्यांचे नेते जिथे आहेत, तिथे त्यांनी विकास व्हावा असं काहीच केलं नाहीये, हेच त्यांचं धोरण आहे,” अशी टीका केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर देखील यावरून भाजपवर टीका केली जात असून, अनेकांनी या निर्णयाला समर्थन दिलं आहे. भाजपवर टीका करताना, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील आक्षेप घेत, “प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जनतेची अशीही मोठी मागणी आहे की अहमदाबादच्या स्डेडिअमला दिलेलं तुमचं नाव काढून तिथेही एखाद्या खेळाडूचं नाव दिलं जावं. इथेही तुम्ही राजकारण आणणार आहात का?”, अशी टीका त्यांनी केली आहे.
प्रिय प्रधानमंत्री @narendramodi जी, जनता की भारी माँग है कि अहमदाबाद के नए स्टेडियम से अपना नाम हटाकर किसी खिलाड़ी के नाम कर दीजिए।
खिलाड़ियों के सम्मान में भी राजनीतिक दाँवपेंच क्यों ?@ABPNews https://t.co/12g0SVrlL6— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) August 6, 2021
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर नावाने, या पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली. क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे. समाजात अशा खेळाडूंना प्रतिमा उंचावणे यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र आता या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.
Read Also :
- मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात
- मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
- मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
- भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान