मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची, सकाळी ११:३० वा. ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सव्वा तास खलबतं झाली. त्यामुळे, पूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती; की या बड्या नेत्यांत कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली?
पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील सांगितला. “बैठकीत युती बाबत कुठलीही चर्चा झाली नाही. पण राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल. आम्ही एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा केली. त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या भूमिका मी समजून घेतल्या. कुणाच्याही २ भूमिका असतात, मला या भेटीत माणूस म्हणून त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती, तशी ती झाली”, असं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
तसेच, “मी सिद्धार्थमध्ये असताना ABVP चं काम करत होतो, तेव्हापासूनच मला त्यांच्याबद्दल आकर्षण वाटत आलं आहे. चांगला माणूस, चांगलं व्यक्तिमत्त्व, फक्त दिसणंच नाही, तर बोलणंही. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, नाशिकला ते जातात, मीही जातो, अचानक भेटलो. आमचं बोलणं झालं, मुंबईत केव्हातरी घरी भेटूया. आज चर्चा झाली”, असं कौतुक करताना, “सध्या मनसे-भाजप एकत्र निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
यावेळी “मनसे-राज ठाकरेंनी परप्रांतीयांची भूमिका बदलल्याशिवाय आमच्यात चर्चा होऊ शकत नाही. मात्र, राज्यातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा, या त्यांच्या भूमिकेत गैर काय?, असं म्हणत त्यांनी भूमिकेचं समर्थन केलं. “महाराष्ट्रातील २ हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना “पुन्हा या” असं सांगितलं जातंच”, असं सूचक विधान करत त्यांनी, “राज ठाकरे माझ्या घरी चहा प्यायला आले तर मला आनंदच होईल”, असंही ते म्हणाले. दरम्यान, या नेत्यांच्या भेटीमुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Read Also :
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?
- “अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनीषा कायंदे यांची खोचक टीका
- ईडब्ल्यूएस’साठी घटनात्मक तरतूद शक्य मग मराठा आरक्षणासाठी का नाही? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना प्रश्न
- पुणेकरांच्या मदतीने कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ मिळाले: महापौर मुरलीधर मोहोळ