मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी मराठा समाजाची दिशाभूल करू नये असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकार यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही असं वक्तव्य केलं होतं. तसंच अशोक चव्हाण यांना आव्हानही दिलं होतं. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिलं आहे.
हे पण वाचा: बाणेर-बालेवाडी भागातील पहिल्या प्रथमोचार आरोग्य केंद्राचे लोकार्पण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किमान आता तरी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. भाजपच्या केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणासाठी तसेच संरक्षण का शक्य नाही? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.
हे पण वाचा: घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा – देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना अधिकार देतानाच ५० टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी काल चव्हाण यांनी केली होती. परंतु, ही मागणी संविधानाच्या मुलभूत चौकटीत बसत नसल्याचं विधान फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलं आहे.
हे पण वाचा: निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने प्रस्ताव पाठवावा; मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मागितला होता का?
त्याला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, संविधानात आरक्षणाची मर्यादा नमूद नाही. ५० टक्के आरक्षण मर्यादा ही न्यायालयांच्या विविध निवाड्यातून समोर आली आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारला घटनात्मक तरतूद करणं शक्य आहे तर मग तोच न्याय मराठा आरक्षणाला देण्याची मागणी संविधानाच्या चौकटीबाहेरची कशी असू शकते? मराठा आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर हे अजिबात अशक्य नाही. देवेंद्र फडणवीस किमान एकदा या विषयावर नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याचे धाडस दाखवतील का? असंही आव्हान चव्हाण यांनी दिले.
Read Also :
- पुणेकरांच्या मदतीने कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ मिळाले: महापौर मुरलीधर मोहोळ
- चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार, मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा?
- मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही – भगतसिंह कोश्यारी
- सर्व तयारी झाली, राज्यात महिनाभरात भाजपचे सरकार येणार आहे; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
- नावडतीचं मिठ अळणी, अशी अमृता फडणवीसांची गतं; किशोरी पेडणेकरांनी लगावली जोरदार चपराक