मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक भेटीनंतर, सातत्याने या दोन्ही पक्षाच्या युतीसंदर्भात वावड्या उठत आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून अजून तरी, ही युती होणारच! अशा प्रकारचे कोणतेही सूचक वक्तव्य केले गेले नसले, तरी कोणाकडून ही शक्यता नाकारलीही गेली नाहीये. त्यामुळे या बातम्या हवा आहेत की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, धक्कातंत्राचा उपयोग करून ही युती होऊ शकते, याबाबत साशंकता आहे.
हे पण वाचा: चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, राज ठाकरे म्हणतात….
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.
हे पण वाचा: राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात पूर परिस्थिती – राज ठाकरे
राज्य ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे. तरं राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे, असं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे मधल्या काळात चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची धावती भेट झाली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची क्लिप तुम्हाला पाठवतो. त्यात उत्तर भारतीयांबद्दल आपलं काय मत आहे हे स्पष्ट होईल, असं सांगितल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
हे पण वाचा: महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
तर राज यांच्याकडून आपल्याला क्लिप प्राप्त झाल्याचंही पाटील यांनी सांगितलं होतं. दरम्यान, पुणे दौऱ्यावर असताना आपण कुठल्याही क्लिप पाटील यांना पाठवल्या नाहीत. अन्य कुणी आमच्यापैकी पाठवल्या असतील तर मी विचारतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
Read Also :
- मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही – भगतसिंह कोश्यारी
- सर्व तयारी झाली, राज्यात महिनाभरात भाजपचे सरकार येणार आहे; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
- नावडतीचं मिठ अळणी, अशी अमृता फडणवीसांची गतं; किशोरी पेडणेकरांनी लगावली जोरदार चपराक
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधी मंजूर; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
- कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका – उद्धव ठाकरे