येवला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्याच कर्माने जाणार आहे. यासाठी राज्यातील जनतेला आता केवळ महिनाभरच वाट पहावी लागणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे, भाजपा आता महिनाभरात सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.
मुंबई लोकलसाठी मनसे आक्रमक, थेट हायकोर्टात याचिका दाखल
महिनाभरात राज्यात भाजपाची सत्ता येणार, यात काही शंका नाही. सर्व तयारी झाली आहे. फक्त महिनाभर वाट पहा, असे महाजन यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री फक्त गाडी चालवतात, त्यांना अजून सरकार चालवता येत नाही, असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काढला.
राज्यपालांचं जे स्थान आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातय – चंद्रकांत पाटील
ईडी ही केंद्रीय तपास संस्था असून ती त्यांचे काम करत आहेत. अनिल देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. मुसळधार पावसाच्या हाहाकारात जनतेचे प्रचंड नुकसान झाले असूनही सरकार अजून ढिम्मच आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. आजही अनेक फाईलीचे ढीग पडून आहेत. शिवसेना-भाजपातील ‘थप्पड वॉर’बाबत आमदार लाड यांनीच खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला काही अर्थ राहिला नाही असेही गिरीश महाजन म्हणाले.
Read Also :
- नावडतीचं मिठ अळणी, अशी अमृता फडणवीसांची गतं; किशोरी पेडणेकरांनी लगावली जोरदार चपराक
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधी मंजूर; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
- कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका – उद्धव ठाकरे
- ४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही? – अमृता फडणवीस
- घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा – देवेंद्र फडणवीस