पुणे: राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. दि.५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ते नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, गुरुद्वारा, परभणीचे कृषी विद्यापीठ इथे भेटी देऊन ते तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.
हे पण वाचा: चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका
पुण्यात आजोयति पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची बाजू घेत, राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले. राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे, राज्यपालांचं जे स्थान आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातय. राज्यपाल त्यासाठी समर्थ आहे, राज्यघटना त्यासाठी समर्थ आहे. पण आम्ही या विषयाबद्दल जे चाललं आहे त्याबद्दल नापसंती व्यक्त करतो.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे पण वाचा: पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. तर तिथेच राज्यपाल आपल्या दौऱ्यावर ठाम असल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा: जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद काही थांबतात दिसत नाही. उलटपक्षी या वादात रोज नवीन अंक जोडला जाऊन, हा वाद विकोपाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या वादाच्या अंकात नवी भर पडली आहे. राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावर राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.
Read Also :
- सामान्यांचं स्वप्न सत्यात उतरणार, यंदा म्हाडा ९ हजार घरांची लॉटरी काढणार
- “शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
- मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला