मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आयोगाने सिंग यांना ६ ऑगस्ला चौकशीसाठी हजर राहण्याचे दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच, ‘लेटरबॉम्ब’वरून उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले असताना, चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? असा सवाल देखील त्यांनी याचिकेतुन केला आहे.
“MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिना १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याबद्दल पत्रही लिहिले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून, या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
तसेच,चांदिवाल समितीस चौकशी आयोग अधिनियम 1952 मधील कलम 4,5 अ, 8,9 नुसार दिवाणी आणि अनुषंगिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास, ही समिती याप्रकरणाचा तपास ईडी आणि इतर संस्थांकडे देण्याची शिफारस करु शकते. राज्य सरकारकडून या समितीला नुकतीच कार्यालयासाठी जागा देण्यात आली असून, ६ महिन्यांत चांदिवाल समितीकडून चौकशी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या रहस्याचा अखेर उलगडा करण्यात NIA ला यश
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोरच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत असून, आत्तापर्यंत त्यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीचे असे ३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातच आता त्यांच्या संदर्भात अजून एका धक्कादायक खुलासा तक्रारदार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला असून, “महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या कटाचा परमबीरसिंग एक भाग होते,” असा दावा त्यांनी केला आहे.
Read Also :
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
- जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
- ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
- मुख्यमंत्री महोदय.. असली थोतांड वक्तव्य अजून किती दिवस करणार आहातं…!
- विद्यार्थांना दिलासा: रखडलेली MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला; आयोगाकडून परिपत्रक जाहीर