मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या ‘अँटीलिया’ घराबाहेर फेब्रुवारी महिन्यात जिलेटीन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि त्यांनतर गाडीचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यू, या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर काही पोलीस अधिकारी यांचा हात असल्याचे, केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात उघड झाले.
महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर. ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा
दरम्यान, या प्रकरणी आता NIA विशेष न्यायालयात मोठा खुलासा केला असून, एनआयएनं हिरेन यांची हत्या का झाली याची माहिती विशेष न्यायालयाला दिली आहे. हिरेन यांची हत्या, सराईत गुन्हेगारांना तब्ब्ल ४५ लाखांची सुपारी देऊन घडवून आणली गेली, असा खळबळजनक खुलासा एनआयएनं केला आहे. हिरेन यांनी चौकशी दरम्यान सगळं काही सांगितल्यास, आपण पूर्णपणे अडकू अशी भीती मुख्य आरोपींना वाटत होती. त्यामुळेच त्यांनी सराईत गुन्हेगारांकडून हिरेन यांचा खून केला.
अमित शहा-पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
२५ फेब्रुवारीला ‘अँटिलिया’च्या बाहेर जिलेटिन कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली आणि सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. दुसरीकडे ही गाडी हिरेन यांची असल्याने ते घाबरले. याचदरम्यान त्यांना अनेकदा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. त्यामुळे, या कटाबद्दल त्यांना बरीचशी माहिती असल्याने आणि ती त्यांनी चौकशीत सांगू नये, या हेतूनेच, पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांची हत्या केल्याचा केली असल्याचा एनआयएचा दावा आहे.
भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….
मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह, ठाण्यातल्या रेतीबंदर खाडी परिसरात ५ मार्चला आढळून आला. खरंतर हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला होता. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांनी तो हाणून पाडला. दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे सध्या तुरुंगात असून, या संपूर्ण घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. तसेच, पोलिसांच्या कारभारावरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Read Also :
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी, संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र