मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद सुरु आहे. राज्यपालांनी १२ आमदारांची यादी प्रलंबित ठेवली असल्याने हा वाद वाढत जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून राज्यपालांवर टीका करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग यांना दबावतंत्र वापरण्यावरून इशारा दिला आहे.
हे पण वाचा: केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…..
हे पण वाचा: क्लिपमधला “तो” आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांनी दिला अहवालाला दुजोरा
‘राज्यपालांनी लोकनियुक्त सरकार ज्याने घटनेनुसार शपथ घेतली आहे त्यांची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. मग ते विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या असतील किंवा एमपीएमसीसंबंधी नियुक्त्या असतील. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. त्यांचे बोलवते धनी कोणी इतर असतं. राज्यपालांनी अशा वादात पडू नये. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हे दिसत आहे,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे पण वाचा: राहुल गांधींच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी‘मध्ये दिला गेला, ‘एकी हेच बळ’चा नारा
‘राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं. पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल,’ असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘राज्यपालांना कोणी हस्तक्षेप करायला लावत आहे का हे पहावं लागेल. जी कामं मंत्रिमंडळाची, मुख्यमंत्र्यांची आहेत त्यात घुसण्याचा प्रयत्न होत असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलेलं मी ऐकलं. हे घटनाविरोधी आहे.
Read Also :
- अमित शहा-पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश