मुंबई: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पूजा चव्हाण हिची आत्महत्या होण्यापूर्वी, तिच्यात आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. हे कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांनी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेला दिले होते. या संभाषणातील एक आवाज राठोड यांचा असल्याचे सांगितले जात होते.
२३ गावांच्या विकास आराखड्याला हाय कोर्टाची स्थगिती; ठाकरे सरकारला दणका
दरम्यान, आता हा आवाज राठोड यांचाच असल्याचे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने सांगितले असून, आता याला पुणे पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. हा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे संजय राठोड यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे.
“ओबीसींसाठी कळवळा असेल तर त्वरित सत्तेतून पायउतार व्हा!” चंद्रशेखर बावनकुळेंचे काँग्रेसला आव्हान
आत्महत्येआधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले आहे. २ महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना हा फॉरेन्सिक अहवालात देण्यात आला आहे. या अहवालातून पूजाच्या आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिटे पूजाच संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, हे संभाषण वंजारा भाषेत होते. दुसरीकडे पूजाच्या आईवडिलांनी दिलेल्या जबाबात कुठलीही तक्रार नसल्याचे यापूर्वीच लिहून दिले असून, हा सगळं राजकीय खेळ असल्याचे सांगितले आहे.
ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यातील राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कारण त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, मध्यंतरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट पुणे पोलिसांनी सादर केल्याची अफवा उठली होती. मात्र असा कोणताही क्लोजर रिपोर्ट सादर केला नसून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
दुसरीकडे, एक साधा फॉरेन्सिकचा रिपोर्ट यायला ६ महिने का लागतात? व्हिडिओ क्लिपमधला आवाज संजय राठोड यांचाच असेल, तर कारवाई का झाली नाही? पुणे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावर या प्रकरणाचा तपास दाबला? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात येत आहे.
Read Also :
- राहुल गांधींच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी‘मध्ये दिला गेला, ‘एकी हेच बळ’चा नारा
- “राहुल गांधींना मातोश्री, बाळासाहेब आणि शिवसेना जाणून घेण्यात इंटरेस्ट”- संजय राऊत
- ‘भाजपच्या काळात खासदारही गॅसऐवजी चूल वापरू लागले’; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…