नवी दिल्ली : राजधानीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा सुरु आहे, ती शरद पवार तसेच, इतर विरोधी पक्षनेते घेत असलेल्या एकमेकांच्या भेटीगाठींची. हा सिलसिला अजूनही जारी असून, आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, विरोधी पक्षांच्या खासदारांना ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’च्या निमित्ताने एकत्र बोलावून बैठक घेतली. यात मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यात आल्याची चर्चा आहे.
“…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली, ती संजय राऊत-राहुल गांधी यांच्या जवळीकीची. शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्या राऊत यांना, या बैठकीत पहिल्या पंक्तीत बसवण्यात आले होते. तसेच, बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते. विशेष म्हणजे, गांधी-राऊत यांच्यात या बैठकी दरम्यान आणि नंतर काही काळ अनौपचारिक चर्चाही झाली, याचा एक फोटो काँग्रेसकडून समाज माध्यमांवर शेअर करण्यात आल्याने; शिवसेना, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएत सहभागी झाल्याचं बोललं जात आहे.
मोठी घडामोड: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट
दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, “राहुल गांधींसोबत राज्यातील राजकीय परिस्थितीवर, राष्ट्रीय पातळीवरील राजकाणावर चर्चा झाली. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धती, जडणघडणीबद्दल, तसेच बाळासाहेबांच्या स्वभाव, कार्यशैलीबद्दल जाणून घेतले. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारची माहिती होती. त्यांनी त्याविषयी मला सांगितलं. मी त्यांना राज्यातल्या राजकारणाविषयी गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांनी त्या मोकळेपणाने समजून घेतल्या. छान चर्चा झाली. भेटत राहू असं आमचं ठरलं आहे, असं सांगितलं.
पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा खुलासा
यावेळी, राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडत केंद्र सरकारवर टीका केली. “पंतप्रधानांची ‘चाय पे चर्चा’ होते. आपली ‘ब्रेकफास्ट चर्चा’ आहे; खरं तर आम्हाला पंतप्रधानांनी बोलवायला हवं होतं. पण ते त्यांच्याच लोकांना बोलावतात आणि आम्हाला साधं पाणीही विचारत नाहीत. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते सर्वांचेच पंतप्रधान आहेत”, असा चिमटा काढत त्यांनी भाजपला टोले लगावले.
केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होत असलेल्या युपीएच्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेना नेते सातत्याने हजेरी लावत असल्याने, शिवसेना युपीए माडेच सामील झाली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता या बैठकीत संजय राऊत हे राहुल गांधी यांच्याच बाजूला बसले होते. तसेच, टेबलवर एकूण ११ नेते बसले होते. त्यात मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे काँग्रेसकडून शिवसेनेलाही सोबत ठेवण्याचं काम सुरु असल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे.
Read Also :
- ‘भाजपच्या काळात खासदारही गॅसऐवजी चूल वापरू लागले’; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- “ओबीसींसाठी कळवळा असेल तर त्वरित सत्तेतून पायउतार व्हा!” चंद्रशेखर बावनकुळेंचे काँग्रेसला आव्हान
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
- मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय