मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणत आहेत. राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्रात दोन सत्ता केंद्र असल्याचं भासवत आहेत असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतःला मुख्यमंत्री आहोत असं समजू नये. राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी येथील दौरे आणि उद्घाटन कार्यक्रम हे राज्य सरकारला कल्पना दिल्याशिवाय केले. त्यांचं हे वर्तन नाराज करणारं आहे. राज्याचे मुख्य सचिव हे राजभवन या ठिकाणी जाऊन राज्य सरकारची नाराजी व्यक्त करणारं पत्रही त्यांना देतील असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
हे पण वाचा: अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
महाराष्ट्र कॅबिनेटच्या मिटिंगमध्येही याबाबत चर्चा झाली तसंच याबाबत मंत्रिमंडळानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यल भगतसिंह कोश्यारी यांचं हे वर्तन योग्य नाही. महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्र आहेत असं राज्यपालांना वाटतं आहे का? असाही प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे.
हे पण वाचा: मोठी घडामोड: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट
घटनेनुसार या देशाचा कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. मात्र त्याच घटनेत तरतूद आहे की संसद गठित झाल्यानंतर जो संसदेचा नेता होईल तेव्हा ते सर्व अधिकार राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधानांकडे सोपवलं पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींचे अधिकार हे राज्यपाल महोदयांकडे असतात. राज्यांमध्ये विधीमंडळ गठित झाल्यानंतर राज्यपालांनी ते अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे द्यायचं असतं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यपाल हे सातत्याने राज्य सरकारच्या अधिकाऱांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे पण वाचा: आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
राज्यपाल विमानाने नांदेडला गेले, त्यांच्या कार्यक्रमाचा दौरा समोर आला आहे. या कार्यक्रमांमध्ये राज्यपालांच्या हस्ते ज्या वास्तूंचं उद्घाटन राज्यापल करणार आहेत. ज्या दोन वास्तूंचं उद्घाटन राज्यपाल करणार आहेत त्यातली एक इमारत अल्पसंख्याक विभागाने बांधली आहे. मात्र राज्यपालांनी दौऱ्यावर जाताना राज्याच्या अल्पसंख्याक विभागाला कल्पना देण्यात आली नाही. ही बाब चांगली नाही असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…..
- पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा खुलासा
- आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
- “…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
- नितीन गडकरी यांचा मास्टर स्ट्रोक; नागपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार कोटी रुपायांच्या कामाचे भुमिपूजन