मुंबई : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हे सर्व जिल्हे सोडून इतर २२ जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
“थोडी कळ सोसा लवकरच शिथिलता देऊ”, वडेट्टीवारांचे पुणेकरांना आवाहन
दरम्यान, राज्य सरकारने काही जिल्ह्यांमधील निर्बंध कडक आणि शिथिल करताच, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील शहरासाठी नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईचा गेल्या २ आठवडय़ांतील पॉझिटिव्हटी रेट १.७६ % इतका आहे, ही बाब लक्षात घेऊनच शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
काय आहेत मुंबईमधील निर्बंध…
- दुकाने आणि आस्थापना आजपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.
- औषधाची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास मुभा.
- हॉटेल्स दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार
- सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
- तरण तलाव आणि मानवी संपर्क अगदी जवळचा येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य खेळ आठवडय़ाचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार खेळण्यास परवानगी
- चित्रिकरणास नियमित वेळेनुसार परवानगी
- मुखपट्टीचा वापर, अंतर नियम आणि अन्य प्रतिबंधात्मक उपायांचे पालनकरण्याचे आदेश.
- आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० आणि भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८नुसार कारवाई करण्यात येणार
- रेल्वे सेवेचा वापर करण्यास सर्वसामान्यांना परवानगी नाही.
- व्यायमासाठी उद्याने, क्रीडासंकुले खुली ठेवण्यास परवानगी.
- व्यायामशाळा, योग केंद्रे, के शकर्तनालये, ब्यूटीपार्लर, स्पा वातानुकू लित यंत्रणा न वापरता सोमवार ते शुक्र वारी रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी. शनिवारी दुपारी ३ पर्यंत तर रविवारी बंद.
- मालाची वाहतूक, कृषी संबंधित व्यवहार, बांधकाम क्षेत्र, औद्योगिक कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा.
अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, हे जिल्हे आणि मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर हे जिल्हे सोडून निर्बंध शिथिल केलेल्या इतर २२ जिल्ह्यांत खालील निर्बंध लागू केले गेले आहेत.
- सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.
- सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
- सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
- कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद
- सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
- शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार
- सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना
- नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.
- रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.
- वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी
- राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.
Read Also :
- “…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
- नितीन गडकरी यांचा मास्टर स्ट्रोक; नागपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार कोटी रुपायांच्या कामाचे भुमिपूजन
- पेगासस फोन टॅपिंग प्रकरणी: मोदी-शहांवर विश्वास नाही, मित्र पक्षातील बड्या नेंत्याची चौकशीची मागणी
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे