मुंबई: मागील काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून दरली आहे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे पण वाचा: लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार म्हणाले, पेगागस हेरगिरीची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी. इतके दिवस विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी केली जात आहे. आम्ही आजवर टेलिफॉन टॅपिंगचे ऐकले आहे. नीतीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या मागणीत सूर मिसळल्याने भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनडीएमधील सहकारी पक्षच जर पेगासस प्रकरणात प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्यास विरोधी पक्षांचे बळही वाढण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
सर्वोच्च न्यायालयात ५ ऑगस्टला होणार सुनावणी
पेगासस हेरगिरी प्रकरणाची विशेष चौकशी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे खंडपीठ ५ ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी सुनावणी करणार आहे. विरोधी पक्ष नेते, पत्रकार आणि इतरांची इस्रायली स्पायवेअरद्वारे हेरगिरी केल्याचा आरोप याचिकेत ज्येष्ठ पत्रकार एन राम, सीपीएम नेते जॉन ब्रिटस आणि वकील एमएल शर्मा यांनी केला आहे.
हे पण वाचा: आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
राऊतांनी मानले आभार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नितीश कुमार बुजुर्ग नेते आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य विरोधी पक्षात गेलंय. पेगसास विषय हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. आम्ही सर्व लोक या संदर्भात सभागृहात सवाल करत आहोत. सरकार देशाची मन की बात ऐकत नाही. आम्ही सरकारची मन की बात ऐकत आलो आहोत. पण आमची मन की बात ऐकली जात नाही. नितीश कुमार या विषयावर बोलले. त्यांचे आभार. ते एनडीएचे घटक आहेत. ते सरकारच्या सोबत आहेत. पण त्यांचा आत्मा आजही आमच्यासोबत भटकत आहे, असं ते म्हणाले.
Read Also :
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
- लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
- औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
- छत्रपती शिवाजी महाराज नाव बदलून अदानी करणं योग्य नाही – नवाब मलिक