पुणे : “सध्या राज्यात अस्तित्वात असलेले महाविकास आघाडीचं सरकार २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतरच अस्तित्वात आलं असतं. पण त्यावेळेस आम्ही (काँग्रेसने) सत्ता स्थापनेत फारसा रस दाखवला नाही आणि महाविकास आघाडी सरकार स्थापण्याचा प्रयोग थांबला”, असा खुलासा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
“थोडी कळ सोसा लवकरच शिथिलता देऊ”, वडेट्टीवारांचे पुणेकरांना आवाहन
“२०१९ नंतर राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघडी सरकारचा प्रयोग, शिवसेना-राष्ट्रवादीला २०१४ सालीदेखील करायचा होता. मात्र, त्यावेळी सत्ता स्थापनेत कॉंग्रेसने रस दाखवला नाही आणि राज्यात युतीचे सरकार आले. मात्र त्यावेळी झालेली झालेली चूक आम्ही २०१९ ला सुधारली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण नक्कीच करेल”, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
“मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
“२०१४ साली युती सरकार सत्तेत येऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळात विरोधकांना संपवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा करून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना त्रास देण्यात आला; एवढेच नाही तर सहकारातील महत्वाच्या कार्यकर्त्यांची राजकीय कारकिर्द संपविण्याचा प्रयत्न झाला, याला त्रासून अनेकांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे या अनुभवांनंतर आम्ही १९ साली सत्ता स्थापनेची आलेली संधी साधली”, असं त्यांनी म्हटलं.
नागपूरात काँग्रेस-भाजपमध्ये संघ मुख्यालयाजवळ राडा
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पडण्याचा अनेकदा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी केंद्राची मदत देखील घेतली जात असल्याचा आरोप सत्तेतील पक्षांनी केला आहे, तर “हे सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीच प्रयत्न करत नसून, त्यांच्याच अंतर्विरोधाने हे सरकार पडेल आणि त्यानंतरच आम्ही एक सक्षम पर्याय देऊ” अशी घोषणा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे, येत्या काळात नक्कीच राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडणार आहे.
Read Also :
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन
- आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल – मनसे
- लोकसेवा आयोगाच्या रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का?, भाजपचा खोचक सवाल
- औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
- छत्रपती शिवाजी महाराज नाव बदलून अदानी करणं योग्य नाही – नवाब मलिक