मुंबई : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे पण वाचा: आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे पण वाचा: मोठी घडामोड: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट
पुरामुले नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. दुकानदारांना ५० हजार आणि टपरीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण घर पडलं असेल तर १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
महत्त्वाचे निर्णय
पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १० हजार रुपये देणार
पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखाची मदत
अर्ध घर पडलं असेल तर ५० हजाराची मदत
दुकानदारांना ५० हजाराची मदत देणार
टपरीधारकांना १० हजार रुपये देणार
उद्यापासूनच मदत देण्यास सुरुवात होणार
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, परभणीसह संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज जाहीर
एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत
४ लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान
४ हजार ५०० जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई देणार
जनावरांच्या मृत्यूंची ७ कोटींची भरपाई देणार
३ दिवसात पंचनामे पूर्ण होणार
Read Also :
- केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…
- पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा खुलासा
- आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
- “…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
- नितीन गडकरी यांचा मास्टर स्ट्रोक; नागपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार कोटी रुपायांच्या कामाचे भुमिपूजन