मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या समोरच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत असून, आत्तापर्यंत त्यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीचे असे ३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातच आता त्यांच्या संदर्भात अजून एका धक्कादायक खुलासा तक्रारदार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला असून, “महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या कटाचा परमबीरसिंग एक भाग होते,” असा दावा त्यांनी केला आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या रहस्याचा अखेर उलगडा करण्यात NIA ला यश
ठाण्यातील भाईंदरमधले बांधकाम व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्हच्या पोलिस ठाण्यात सिंग यांच्याविरुद्ध, आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी परमबीर सिंग व अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून परमबीरसिंह, मुंबई पोलीस दलातील ५ अधिकारी आणि सुनील जैन, संजय पुनामिया या व्यापाऱ्यांविरोधात १५ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थांना दिलासा: रखडलेली MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला; आयोगाकडून परिपत्रक जाहीर
त्याच अग्रवाल यांनी आता हा दावा करताना अधिक म्हटले आहे की, “संजय पुनामिया हा परमबीरसिंगांचा ‘लायझनिंग एजंट’ होता. तो पैसे वसुली करायचा. त्याने २०१६ आणि २०२१ मध्ये आमच्यकडून पैसे घेतले. मला आणि साहेबांना केंद्राचा पाठिंबा आहे, असं तो नेहमी बोलून दाखवायचा. माझ्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याने सीबीआय चौकशी सुरू होणार असल्याचे आणि राज्यातील मोठ्या नेत्याचा राजीनामा संदर्भात मला माहिती दिली होती. ते सगळे खरे झाले”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर. ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा
तसेच, “राज्यातील ४-५ मंत्र्यांच्या घरी सीबीआय छापा टाकेल. परिणामी सरकार पडेल आणि केंद्रीय यंत्रणांच्या जोरावर याहीपेक्षा अजून वेगळे काहीतरे करण्याचा त्यांचा प्लॅन होता,” असा खुलासाही त्यांनी केला आहे. दरम्यान, या अग्रवाल यांच्या या सगळ्या दाव्यांना तक्रारदार अग्रवाल आणि आरोपी पुनमिया यांच्यात, मार्च महिन्यात झालेल्या, सुमारे साडेतीन चाललेल्या बैठकीच्या टेपचा आधार आहे.
अमित शहा-पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, ही टेप पोलिसांकडे सादर करण्यात अली असून, पेन ड्राईव्हमध्ये ३ आणि २ तासांचे संभाषणही सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने, आता परमबीरसिंग यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, याआधी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटक होण्यापासून वाचण्यात परमबीरसिंगांना यश आले असले तरी, या गुन्ह्यात मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
Read Also :
- भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…