जळगाव: भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनीही ईडीने अटक केली. ईडीच्या या कारवाईनंतर खडसे विरुद्ध भाजप हा सामना पुन्हा रंगला होता. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मात्र खडसे हा विषय भाजपसाठी जुना झाल्याचं म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
हे पण वाचा: ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
“एकनाथ खडसे यांचा विषय आता जुना झाला आहे, त्यामुळे मी त्यावर आता काही बोलणार नाही. मात्र ज्यांनी भाजप सोडला त्यांची अशीच दुर्गती झाली आहे. येत्या निवडणुकांमध्ये लवकरच दुध का दुध आणि पानी का पानी होईल.” आशिष शेलार जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप सोडल्यानंतर माझ्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावला जात असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्याला आशिष शेलारांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.
हे पण वाचा: बांधकाम व्यावसायिकचा धक्कादायक दावा, “होय! परमबीर सिंग महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या कटात सामील”
यावेळी बोलत असताना आशिष शेलारांनी स्थानिक प्रश्नांपासून ते राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रीया दिली. आमदार गिरीश महाजन यांना डावलले जात असल्यासंदर्भात मुद्यावर बोलताना आमदार शेलार म्हणाले की,”आमदार महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाचा नाही. कोकणातील पूरग्रस्त परिस्थितीत ते मदतीला धावून गेले. राज्याच्या आणि स्थानिक नेतृत्वामध्ये कोणताही बदल होणार नाहीये.”
Read Also :
- राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर बघून, आख्खी भाजप कामाला लागली; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
- जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव