मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावरही टीका केली होती. ‘मागील दोन वर्षात ठाकरे सरकारनं ‘फटे लेकीन हटे नही’ चं धोरण अवलंबलं आहे. आता शिवसेना नेत्या मनिषा कायदे यांनी आपल्या शैलीत चित्रा वाघ यांना प्रत्यूत्तर देले आहे.
हे पण वाचा: जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
“चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणूनच त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत,” असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या काही गोष्टी झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, असा टोलादेखील त्यांनी लगावला.
हे पण वाचा: पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?
चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावरही टीका केली होती. ‘मागील दोन वर्षात ठाकरे सरकारनं ‘फटे लेकीन हटे नही’ चं धोरण अवलंबलं आहे. ‘औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच… कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार… MPSC च्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार… लॉकडाऊन काळातील वीजबील माफ करणार… अशी आश्वासनं ठाकरे सरकारनं दिली होती. मात्र, त्याचं पुढं काहीच झालं नाही. ‘जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य मात्र या सरकारनं केलं,’ असा संताप वाघ यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा: चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका
रुपाली चाकणकर यांची वाघ यांच्यावर टीका
राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या 'फटे लेकीन हटे नही' ची तर पतीला वाचवण्यासाठी 'फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे' ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 4, 2021
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या ‘फटे लेकीन हटे नही’ ची तर पतीला वाचवण्यासाठी ‘फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे’ ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे,’ अशी खोचक टीका चाकणकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
Read Also :
- मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
- राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर बघून, आख्खी भाजप कामाला लागली; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…