मुंबई: मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्यातल्या मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. यावरून सत्तेतील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेला भाजप एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आणि राज्यात पुन्हा एकदा मराठा क्रांती मूक मोर्चाची हाक देण्यात आली. यांनतर संभाजीराजेंनी राज्यव्यापी दौरा करत, काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आणि नंतर आंदोलनाचा इशारा दिला.
हे पण वाचा: ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाला कारणीभूत असलेल्या १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केले जावेत, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केला आहे. या नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
हे पण वाचा: “घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीबाबत केंद्राने चालू अधिवेशनात स्पष्टीकरण करावे”, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मात्र, फक्त राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही. तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढणं गरजेचं असल्याचं मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
हे पण वाचा: ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. मात्र, राज्यांना केवळ अधिकार देऊन फायदा नाही. तर इंदिरा सहानी प्रकरणातील निर्णयावर शिथिलता दिली पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. अन्य राज्यांनीही तशी मागणी यापूर्वी केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकरनं या मागणीबाबत भूमिका मांडली नाही तर केवळ चालढकल केल्याचा आरोपही चव्हाण यांनी केलाय.
Read Also :
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
- राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर बघून, आख्खी भाजप कामाला लागली; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
- झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन