पुणे: राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याला जबाबदार राज्य सरकारचा ढिसाळ कारभर आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी केली आहे.
हे पण वाचा: भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
आज राज ठाकरे माध्यमाशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला चागलचे धारेवर धरले आहे. महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा दावाच राज्य ठाकरें यांनी केली आहे. सरकार कुठलही असो ते इंच इंच खाण्याच काम करत असत असाही त्यांनी यावेळी आरोप केला आहे.
हे पण वाचा: ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
तसेच राज ठाकरे यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर सुद्धा त्यांनी चांगलेच ताशेरे आढोले आहे. पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे. पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या ? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपने काय केले याची पोलखोल करा. तसेच आगामी महापालिका निवडणूकीसाठी आपापल्या वॉर्डाचे संघटन मजबूत करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
हे पण वाचा जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बुधवारपासून विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. पहिल्या दिवशी कसबा, पर्वती व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघाची किमान दीड ते दोन तास बैठक घेऊन चर्चा केली, पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे हे देखील ऐकून घेतले. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी थेट संवाद साधता आल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला होता.
Read Also :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात, देश सुरक्षित नाही; संजय राऊत यांची टीका
- राज्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत,आज मंत्री मंडळात निर्णय होण्याची शक्यता
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल