नाशिक: शिवसेनेसोबत राजकीय अंतर वाढल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या जवळीक वाढण्यावर वारंवार वक्तव्य करताना दिसत आहेत. अगदी फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात जर तर जोडत मोठी वक्तव्य केली आहेत.
हे पण वाचा: पुण्यातील रिंग रोडसाठी कोणत्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही; एकनाथ शिंदे यांची माहिती
त्यामुळे मोठा राजकीय संभ्रम पाहायला मिळत होता. मात्र याच संभ्रमावर मनसेतून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कारण या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
हे पण वाचा: “आता देशाला ‘सच्चे दिन’ दाखवण्याची गरज, सर्व विरोधक एकत्र आले तर ६ महिन्यातच परिणाम दिसतील”
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे काल नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. मागील ५ वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला.
हे पण वाचा: प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई होणार? उच्च न्यायालयाने दिले ईडीला आदेश
नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
- नागपुरात ‘बॅनर वॉर’, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचं महापालिका मुख्यालयात आंदोलन
- पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, १२ ठिकाणांवर सीबीआयने जलदगतीने टाकले छापे
- राज्य सरकारकडून १४ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु