मुंबई: राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका आणि कोरोनाचे रुग्ण बघता काही प्रमाणात लॅाकडाऊन करण्यात आला आहे. सध्या राज्यातील कोरोणाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. तसेच राज्यात दोन डोस घेतलेल्याचे सुद्धा प्रमाण मोठ्या प्रणात आहे. लॅाकडाऊनमुळे अनेक व्यापाऱ्याचे मोठ्या प्रणाणात नुकसान झाले आहे. किमान दुकानाच्या वेळा रात्री ८ पर्यंत तरी करा, अशी आग्रही मागणी बहुतांश मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली.
हे पण वाचा: पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत
त्याला मुख्यमंत्र्यांनी सहमती दिली असून दोन दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा एकंदर मूड पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारचा कोल्हापूर जिल्ह्याचा पाहणी दौरा स्थगित केला असून आज कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे.
हे पण वाचा: ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
बुधवारी सह्याद्री अतिथिगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यावर चर्चा झाली. या वेळी आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यापारी व दुकानदारांच्या अडचणींचा पाढा वाचला. दुकानाची वेळ किमान रात्री ८ पर्यंत तरी करा, आठवड्यातील दोन दिवसांचा लॅाकडाऊन एका दिवसावर आणा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. त्याला अनेक मंत्र्यांनी दुजारो दिला.
हे पण वाचा: भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्ण शिथिलता शक्य नाही
राज्यातील ८ जिल्ह्यांत पूरग्रस्त स्थिती आहे. अशा जिल्ह्यात बचाव पथके बाहेरून गेली आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. आपण सध्या पूर एके पूर याकडे पाहतो आहोत. मात्र राज्यातील कोरोना संपलेला नाही, त्यामुळे लगेच पूर्ण शिथिलता शक्य नाही,असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
हे पण वाचा: जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
राजेश टोपे म्हणाले, तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण शक्य
केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. ही तिसऱ्या कोरोना लाटेची नांदी आहे. तिसऱ्या लाटेत राज्यात ६० लाख रुग्णसंख्या असू शकते. कोरोना प्रतिबंधाचे नियम आणि जास्तीत जास्त लसीकरण यामुळे तिसरी लाट शक्य तितकी थोपवून धरली पाहिजे.
Read Also :
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक
- ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
- भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
- जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये पुराचे थैमान;, १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू