पुणे : सध्या पुण्यामध्ये लागू असलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आणि मुख्य सचिवांशी चर्चा केली. पुणे महापालिकेने सुधारित प्रस्ताव पाठवला तर पुणे शहराला मुख्यमंत्री निर्बंधांपासून दिलासा देऊ शकतात, असे टोपे यांनी सांगितले. त्यावर, मुंबई महापालिकेला असा प्रस्ताव पाठवायला सांगितले होता का? असा सवाल भाजप नेते तथा पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपस्थित केला आहे.
“शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी राज्य सरकार कडून निर्बंधांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. २५ जिल्ह्यांत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्याचबरोबर ११ जिल्ह्यात निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले. या ११ जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरात लेवल ३ चे निर्बंध लागू आहेत. यावरून पुण्याचे व्यापारी आक्रमक झाले आहेत.
मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
दरम्यान, याच प्रश्नावर पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेकडून मागविण्यात आला होता का? पुणे महापालिकेला इतकी सापत्न वागणूक का? प्रस्ताव पाठवावा म्हणजे आम्ही आमच्या न्यायासाठी ‘अर्ज’ करायचा का? जर आम्ही प्रस्ताव पाठवलाच तर उद्धव ठाकरे आरोग्यमंत्र्यांचे ऐकतील का? असे म्हणत पुणेकरांनां न्याय हवा, असे गणेश बिडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, बीडकरांच्या सवालांची उत्तरे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री देतील का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- ‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत
- “वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
- निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- रिंगरोड बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवारांचं अमित शहांना ‘गोड’ निमंत्रण; पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? जाणून घ्या