पुणे : रिंगरोडसाठी कुणाच्याही दबावाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये देवेंद्र फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार रिंगरोडचे काम झाले पाहिजे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आ्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
हे पण वाचा: झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
मांडवी बुद्रूक, बहुली,वरदाडे, शिवगंगा खोरे,रहाटवडे, कल्याण (हवेली), रांजे, कुसेगाव, खोपी, कांजळे, केळवडे, भोर या गावांमधील शेतकरी रिंग रोडमुळे बाधित होणार आहे. या गावाच्या सरपंच व शेतकऱ्यांनी आज चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, कैफियत मांडली. रिंगरोडची प्रस्तावित आखणी बागायत क्षेत्रातून रद्द करून डोंगर पायथ्याने माळरानातून व्हावी. तसेच रस्त्यांची रुंदी ११० मीटर ऐवजी ९० मीटर व्हावी. त्यास सर्व्हिस रस्ता असला पाहिजे. तसेच बाधित शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुण सुरु असलेले जमीन अधिग्रहण थांबवून त्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी या बैठकीत शेतकऱ्यांनी केली.
हे पण वाचा: “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
त्यावर पाटील म्हणाले, ‘‘रिंगरोडसाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कृती आराखडा मंजूर केला होता. पण तो आघाडी सरकारने रद्द केला. शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुण रिंगरोडची निर्मिती होणार असेल, तर भाजप त्यास विरोध करेल. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, पीएमआरडीए व एमएसआरडीसींच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
Read Also :
- शरद पवारांचं अमित शहांना ‘गोड’ निमंत्रण; पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? जाणून घ्या
- “शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
- मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला