मुंबई: केंद्र सरकार देशातील महत्वाच्या चार आधार स्तंभालाच सुरुंग लावण्याचे काम करत आहे. संसद, मिडीया न्यायालय प्रशासन या कोणाच्या ही संदर्भात केद्र सरकारची भुमिका प्रामाणिक नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हे पण वाचा: निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
राऊत म्हणाले की, पेगसस प्रकरणा अत्यंत गंभीर आहे, त्यावर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, न्यायलाच सुद्धा जर ऐकत नसेल तर आम्ही न्याय मागायला कोणाकडे जायाच असा सवाल त्यांनी मिडीयाशी बोलताना उपस्थीत केली आहे. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भेट होणार आहे त्यांमध्ये एक निर्यण होईल.
हे पण वाचा: “वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
शेतकऱ्या सोबत चर्चा होण्याची शक्यता
आज विरोधी पक्षाची भेट होणार आहे, यामध्ये जे शेतकरी आंदोलनाला बसले आहे. त्याच्या सोबत चर्चा होणार अशी शक्यता त्यांनी यावेळी सांगितले आहे. संसदते शेतकऱ्या विषयी बोलू दिल जात नाही असा आरोप त्यांनी केली आहे. शेतकरी कायदा मागे घ्यावा यासाठी सर्व विरोध आवाज उठवत आहेत. परंतू त्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे पण वाचा: ‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत
केंद्रीय निर्णयाचे स्वागत करावे की आरक्षणाचा विषय गुंतवून ठेवल्याबद्दल निषेध करायचा?
“मराठा समाजास नोकऱ्या, शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठा झगडा सुरू आहे. हक्क आणि न्यायाचा हा झगडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण व १०2 वी घटनादुरुस्ती वगैरे करण्याची जबाबदारी केंद्रावर टाकली. महाराष्ट्र विधानसभेने याबाबत केलेला कायदा मान्य केला नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार काय करतेय याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. आता मराठा समाजाला मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजूर केला आहे. या केंद्रीय निर्णयाचे स्वागत करावे की गुंता जास्त वाढवून त्या गुंत्यास मराठा आरक्षणाचा विषय गुंतवून ठेवल्याबद्दल निषेध करायचा?”
Read Also :
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?
- “अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनीषा कायंदे यांची खोचक टीका
- ‘ईडब्ल्यूएस’साठी घटनात्मक तरतूद शक्य मग मराठा आरक्षणासाठी का नाही? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना प्रश्न
- पुणेकरांच्या मदतीने कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ मिळाले: महापौर मुरलीधर मोहोळ
- चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार, मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा?