हिंगोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान, कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना अपघात झाला आहे. या अपक्षातात ३ गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याचं राज्यपालांना या बैठकीतून समजले. हिंगोली जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेक्षा कमी सिंचन क्षेत्र असल्याचे या बैठकीतून त्यांना माहिती मिळाली. काही इतर विकास कामे प्रलंबित आहेत, त्याचा आढावा राज्यपालांनी घेतला. जिथे जिथे विकास कामे अर्धवट स्थितीत आहेत, याबाबत आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांना रिपोर्ट सादर करणार आहोत असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेनी नाही.
Read Also :
- मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
- पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
- सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?