मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, “ही सदिच्छा भेट होती. यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही किंवा तसा प्रस्तावही दोन्हीकडून ठेवला गेला नाहीये”, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले. मात्र आता यावर मनसे नेते बाळा नांदगावकर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
या भेटीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे की; “चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा आनंदात होते. सारं काही सकारात्मक दिसत होतं. राज ठाकरे-अमित ठाकरेंनी नाशिक-पुण्याचा आणि ठाण्याचा दौरा केला. मुंबई देखील पक्षाची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत आणि राज्यातल्या सर्वच पक्षांची आपापल्या पातळीवर कामं सुरु आहेत. मात्र, हे २ पक्ष भविष्यात एकत्र येण्याच्या प्रयत्नात असतील, तर त्याचा आनंदच असेल”, असं त्यांनी म्हटलं आहे.
भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
तसेच, “राजकारणात पुढच्या हालचाली आखण्यासाठी काही ठोकताळे असतात. त्याचा अंदाज प्रत्येकच पक्ष घेत असतो. २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अश्याच प्रकारे ठोकताळ्यांचा अंदाज घेऊन, शिवसेना प्रमुखांना बोलवून केल ना स्थापन सरकार! त्याचप्रमाणे आज झालेल्या भेटीचाही हा ठोकताळाच आहे,” असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे, नांदगावकरांच्या या विधानाने नक्कीच या सगळ्या भेटीला एक वेगळाच दृष्टिकोन दिला आहे.
राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
त्यामुळे, येत्या काळात महापालिका निवडणुका ऐन तोंडावर असताना, हे दोन पक्ष आपली युती जाहीर करणार का? की या निवडणुकीत स्वतःच पक्षीय बलाबल जोखून आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांची तयारी आणि मोर्चेबांधणी सुरु आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात दोन्ही पक्षांच्या विधानांवरून आणि ठोकताळ्यावरून मिळेलच. मात्र आजच्या भेटीमुळे नक्कीच सत्ताधारी पक्षांच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली असेल, हे नक्की!
Read Also :
- पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
- सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?
- “अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनीषा कायंदे यांची खोचक टीका