पुणे : नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतं आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात २९ अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. ST कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगून सरकारच्या निषेधासाठी सोमवार, १ नोव्हेंबरला काळी फीत लावूया, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका – भाजप
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत प्रचंड नैसर्गिक संकटे आली आहेत, त्याला कोणी जबाबदार नाही, पण त्या आपत्तीनंतर सरकार कोणत्याही प्रकारचे नकसान भरपाई न देता केवळ पोपटपंची करतय, हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रचंड अस्वस्थ करणारे आहे. ही भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी होणार आहे. मराठवाडा विदर्भात ३८ लाख हेक्टरवरील पिके वाहून गेलीत. ११ लाख हेक्टर जमीन वाहून गेली आणि एक कवडीची मदतही मिळाली नाही. केवळ दहा हजार हेक्टरी मदत देणार आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी २० हजार रुपये हेक्टर मदत दिली होती.
नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात २९ अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. ST कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगून सरकारच्या निषेधासाठी उद्या काळी फीत लावूया. @BJP4Maharashtra pic.twitter.com/FQ3eXkq6IC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 31, 2021
हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसल्याचा प्रकार आहे. या कारणामुळे उद्या एसटी कामगार आणि शेतकरी यासाठी राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत. काल दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तर आतापर्यंत एकूण २९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा निषेध म्हणून एसटी कर्मचारी आणि शेतकऱ्यांना सर्पोट म्हणून काळ्या फिती लावून निषेध नोंदवावा असे अवाहनही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केले.
Read Also :
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे तुम्ही जाण ठेवा : माजी उपसंरपंच अमोल शिवले
- दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार – किरीट सोमय्या
- समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत – रामदास आठवले
- ‘मुळा’मधील वरिष्ठांच्या त्रासामुळे तरुणाचा गळफास; आत्महत्येमागे अहमदनगरच्या शिवसेना मंत्र्याचा हात?
- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभार रचनेचा खेळखंडोबा थांबेना; फेब्रुवारीत होणारी निवडणूक लांबणीवर जाणार?