पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य शासन पातळीवर सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे, महापालिकेतील निवडणुक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी गोंधळून गेले आहेत. आरक्षण, प्रभाग रचना आणि नव्याने सदस्य संख्या वाढ यामुळे प्रारुप प्रभाग रचनेचे काम वेळेत होणार नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुक विभागाला तिसऱ्यांदा नव्याने आराखडा करावा लागणार आहे. १२८ असणारे प्रभागाचे नियोजन १३९ नुसार बदलावे लागणार आहे. तर फेब्रुवारीत होणारी निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
असं का? लै मस्ती आलीये वाटतं? उदयनराजेंनी थोपटले दंड
पिंपरी चिंचवड महापालिकेतील २०१७ ची निवडणुक चार सदस्यीय पद्धतीने झाली होती. त्यामुळे भाजपला फायदा झाला होता. राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार आल्याने चार सदस्यीय पद्धत बदलण्यात येणार असल्याची चर्चा होती. याबाबत निर्णय न झाल्याने राज्य निवडणुक आयोगाने ऑगस्टमध्ये एक सदस्यीय वार्डनुसार प्रारुप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले होते. त्यानुसार महापालिकेतही प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने २३ सप्टेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईवगळता सर्व महापालिकांमध्ये ती सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक सदस्यीय वार्डनुसार प्रारुप आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच महापालिकेतील अधिकाऱ्यांनी नव्याने तीन सदस्यीय प्रभागानूसार कच्चा आराखडा तयार केला.
भाजपला मोठा धक्का: शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!
सदस्यांचा कालखंड १३ मार्च २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे निवडणुक प्रारुप रचना करण्यात अडचणी येत आहेत. तिसऱ्यांदा रचना बदलावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुक विभागातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. प्रारुप तयार होऊन, सुचना आणि हरकती, आरक्षण, निवडणूक कार्यक्रम लक्षात घेता फेब्रुवारीत निडवणूक होणे अवघड असल्याची चर्चा महापालिक वर्तुळात आहे.
नवीन रचनेचे आदेश नाहीत
लोकसंख्येच्या सुत्रानुसार राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बुधवारी नगरसेकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १२८ ऐवजी सदस्यांची संख्या १३९ होणार असून प्रभागाची संख्या ४६ होणार आहे. प्रभागांच्या सीमांकरनाचा प्रारुप आराखडा तयार असताना आता निडवणूक विभागातील अधिकाऱ्यांना नवीन निर्णयानुसार, प्रभागानुसार प्रारुप आराखडा तयार करावा लागणार आहे.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका – भाजप
- देगलूर – बिलोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच दणदणीत विजय मिळवेल; बाळासाहेब थोरातांचा दावा
- केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणे माझ्यासाठी महत्वाचे आहे – संजय राऊत
- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँकेच्या चौकशीला हायकोर्टाचा हिरवा कंदील
- राष्ट्रवादीचे भोसरीतील ‘मॅनेजमेंट गुरू’ अजित गव्हाणे दुसऱ्यांदा ‘फेल’