पुणे : राजकारणात असलो तरी मला कधी मंत्री व्हावे, असे वाटले नाही. केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणे महत्वाचे आहे. असे शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सांगितले. ते आज (ता. ३०) पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते.
छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे नाशिकमध्ये एकाच मंचावर येणार; काय आहे नेमकं कारण…वाचा…
राऊत यावेळी म्हणाले, मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे. पत्रकारांनी राजकीय पक्षाचे अंकित होऊ नये. पत्रकारिता करत असताना काही पथ्य पाळली पाहिजेत. देशातील परिवर्तन हे वृत्तपत्रांनी केले यावर मी ठाम आहे. आता वृत्तपत्रांसमोर अनेक आव्हाने आहेत. चौथा स्तंभ म्हणता मात्र, त्यांना संसदेत येण्यास नाकारले जात आहे. यावर आवाज उठवला जात नाही. पत्रकारांमध्ये एकजूट हवी. भविष्यात असे काही दिसते की राज्यकर्ते माध्यमांना आपल्यासारखे वागवतील ते वाईट आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
माध्यमांमध्ये 72 तासात कुठल्याही क्षणी आर्यन खान बाहेर येईल, अशी बातमी दाखवली गेली. शेतकरी, महागाई असे अनेक विषय आहेत. मात्र, आर्यन खानची बातमी आल्यानंतर इतर बातम्या निघून जातात. सामान्य माणसांनी का बातम्या बघायच्या किंवा वाचायच्या? असा सवालही राऊत यांनी केला. कोणत्याही सरकारला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते नको आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाकाळात एका वृत्तपत्राने मृतदेहांचे फोटो दाखवले. तेव्हा त्याच्यावर आठ दिवसांत धाडी टाकण्यात आल्या. मात्र, त्यावेळी त्यांच्या पाठीशी कोण उभे राहिले? देशातील मीडिया उद्योजकांच्या हाती जात आहे. आजची पिढी लिहायला आणि कागद पेन विसरली आहे. हेच मोठे आव्हान आहे, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
Read Also :
- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँकेच्या चौकशीला हायकोर्टाचा हिरवा कंदील
- राष्ट्रवादीचे भोसरीतील ‘मॅनेजमेंट गुरू’ अजित गव्हाणे दुसऱ्यांदा ‘फेल’
- भाजपला मोठा धक्का: शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!
- असं का? लै मस्ती आलीये वाटतं? उदयनराजेंनी थोपटले दंड
- जिल्हा नियोजन समितीच्या निधी वर्ग करू नका, अन्यथा आत्मदहन करू; शिवसेना आमदाराचा इशारा