मुंबई : शेतकरी आत्महत्यांचे पाप डोक्यावर असताना राज्य सरकारने आता आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे पाप डोक्यावर घेऊ नये, अशी कळकळीची विनंती भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
वेतन वेळेवर मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 1999 नंतर राज्यात सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हापासून राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले होते. त्यासंदर्भात लाड यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुळात शेतकरी आत्महत्या हेदेखील काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप आहे. 1999 नंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वर्ग करू नका, अन्यथा आत्मदहन करू; शिवसेना आमदाराचा इशारा
त्याचबरोबर आपल्या तुंबड्या भरण्याच्या तत्कालीन सत्ताधारी नेत्यांच्या वृत्तीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान खालावून त्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. एकीकडे नेत्यांची वाढती संपत्ती व दुसरीकडे नागरिकांची दुरवस्था हे जनतेच्या डोळ्यात येऊ नये म्हणून तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी विषारी जातीय प्रचार महाराष्ट्रात सुरु केला. अशाप्रकारे त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली व आताही एसटी कर्मचाऱ्यांबाबत महाविकास आघाडी हेच धोरण वापरीत आहे, असे लाड यांनी दाखवून दिले आहे.
असं का? लै मस्ती आलीये वाटतं? उदयनराजेंनी थोपटले दंड
सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटी तोट्यात गेल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे खासगी उद्योगसमूहांचा नफा गगनाला भिडत असताना, सरकारने कल्पकता दाखवली असती तर एसटी तोट्यात जाण्याचे काहीच कारण नव्हते. एकीकडे खासगी वाहतूकसेवा, मग त्या लक्झरी असोत वा ओला-उबेर असोत, वेगाने फोफावत असताना एसटी देखील चांगला नफा मिळवू शकते. मात्र सरकारलाच एसटी चालविण्याची इच्छाशक्ती नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. दूर डोंगरदऱ्यांमध्ये गावोगावी जाणारी एसटी बंद पडून चालणारच नाही. अशा स्थितीत निदान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान द्यावे व कोणत्याही परिस्थितीत यापुढे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, असे आवाहनही लाड यांनी केले आहे.
Read Also :
- देगलूर – बिलोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच दणदणीत विजय मिळवेल; बाळासाहेब थोरातांचा दावा
- केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणे माझ्यासाठी महत्वाचे आहे – संजय राऊत
- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँकेच्या चौकशीला हायकोर्टाचा हिरवा कंदील
- राष्ट्रवादीचे भोसरीतील ‘मॅनेजमेंट गुरू’ अजित गव्हाणे दुसऱ्यांदा ‘फेल’
- भाजपला मोठा धक्का: शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!