मुंबई – मुंबई मेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने एमएमआरडीएला दिले आहेत. सध्या या भूखंडावरील काम जैसे थे ठेवावे असे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असे हायकोर्टाने सांगितले.
दरम्यान, या मुंबई उच्च न्याय्यळायच्या निर्णयावरून भाजपने ठाकरे सरकारला चांगले वेठीस धरले आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी सुद्धा कांजूरप्रकरणी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. “करोडो रुपयांची वाट लावत ठाकरे सरकारने लोकांच्या पैशाचा चुराडा केला.या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही.” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
“मुंबई मेट्रो कारशेड प्रकल्प ठाकरे सरकारच्या इगो मुळे रखडला जातोय. उच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला मोठा झटका देत प्रकल्पाला स्थगिती दिली. करोडो रुपयांची वाट लावत ठाकरे सरकारने लोकांच्या पैशाचा चुराडा केला. या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही.”, असे निलेश राणे म्हणाले.
मुंबई मेट्रो कारशेड प्रकल्प ठाकरे सरकारच्या इगो मुळे रखडला जातोय. उच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला मोठा झटका देत प्रकल्पाला स्थगिती दिली. करोडो रुपयांची वाट लावत ठाकरे सरकारने लोकांच्या पैशाचा चुराडा केला. या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2020