पंढरपूर : अत्यंत चुरशीच्या झालेल्या आणि सत्ताधारी-विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सन्मानाच्या बनवलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत, भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. मात्र विजयाच्या कैफात राहता, त्यांनी थेट कामालाच घात घातल्याचं आज पाहायला मिळालं.
राज्यात वाढणाऱ्या महामारीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाल्या मात्र यांनतर या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर महामारीने बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे, यांनी आज तातडीने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली.
यात त्यांनी, मतदारसंघातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकही उपस्थित होते. त्याचबरोबर लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबतही माहिती घेतली. त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उजनी धरणातील 5 टीएमसी पाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आवताडे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी, ३७३३ मतांनी आघाडी घेत बाजी मारली.