मुंबई : कोरोना महामारीने राज्यात थैमान घातले होते. त्यामुळे अनेकांचे बळी गेले. अनेकांची पाल्या, आई-वडील मृत्यूच्या खाईत लोटले गेले. त्यामुळे अनेकांवर शिक्षणासह अनेक जबाबदारीचे ओझे येवून टेपले असताना कोरोनाचा कहर कमी होण्याचे नाव घेत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाबाबत राज्य सरकारने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
”राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र…” उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण कसे पुर्ण करायचे?, असा पेच निर्माण झाला असतानाच राज्य सरकारने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) July 14, 2021
राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकुण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
Read Also :
- कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
- “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
- “३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
- ”राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र…” उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
- ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका!