मुंबई : पुण्यातल्या, जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या सिरम इस्न्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदर पूनावाला यांना, सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील सीरमचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पुनावाला यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केली होती.
सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं की, “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोविड 19 विरोधातील युद्ध लढत आहोत. मात्र, मागील काही काळापासून अदर पुनावाला यांना कोविशिल्डचा पुरवठा व्हावा यासाठी वेगवेगळ्या गटांकडून धमक्या येत आहेत.
मात्र, भारतात आपल्या जीविताला निर्माण होत असलेल्या वाढत्या धोक्यांमुळे, आदर पुनावाला यांनी भारत सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेतल्याच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये येत आहेत. तसेच राज्य सरकारमधील जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत, याबाबतीत खरे खोटे लवकर कळायला हवे अशी भूमिका मांडली आहे.
सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे . द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत,आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल. NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे …देशाला हे कळायला हव#खरे_की_खोटे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 1, 2021
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी, भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगून, आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये लसीचं उत्पादन करण्याबाबत इशारा दिला आहे.
India’s vaccines supremo hints that he may start producing in Britain and tells Martin Fletcher about threatening calls from the rich and powerful https://t.co/KaHsKfy6gS
— The Times (@thetimes) May 1, 2021
याबाबत त्यांनी, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल”, असे स्पष्टीकरण टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे. भारतासाठी हा मोठा धक्का समाजला जात असून, भारतातील ९०% करोना लसींचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख यांनी आंतरराष्ट्रीय मॅगेझिनमध्ये असे वक्तव्य केल्याने, खळबळ माजली आहे.