विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला. या एन्काऊंटरनंतर काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.
विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर आता योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह काही नेत्यांनी ट्वीट करत या घटनेनंतर सरकारवर टीका केली आहे.
गुन्हेगाराचा अंत झाला, गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना सुरक्षा देणाऱ्या लोकांचं काय? असा सवाल करत विकास दुबेच्या एन्काऊंटनंतर प्रियांका गांधींनी ट्वीट केलं आहे.
अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको सरंक्षण देने वाले लोगों का क्या?
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 10, 2020
खरतंर ही कार पलटलेली नाही, रहस्य उलगडून सरकार पलटण्यापासून वाचवलं गेलं आहे, असं ट्वीट समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश सिंह यांनी केलंय.
दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 10, 2020