मुंबई : शिवसेनेच्या फुटलेल्या 16 आमदाराच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या सुुनावणीत आज दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना राज्यपालांनी मंत्र्यांना शपथ कशी दिली? राज्यात सरकार स्थापन कसं झालं? असा सवाल करत हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार एकही दिवस राहता कामा नये, असं कपिल सिब्बल म्हणाले. तर शिंदे गटातील वकिलांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
“इडीकडून राऊतांना पुन्हा नोटीस”; किरीट सोमय्या म्हणाले की, “अब संजय राऊत की बारी है…”
शिवसेनेेचे बारा खासदारांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. यातच भाजपचे खासदार डॉं. अनिल बोंडे यांनी काॅंग्रेसला यावरूनच डिवचलं आहे. तर आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, असं प्रत्युत्तर देत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोंडेंचा समाचार घेतला आहे. ते भंडारा जिल्ह्यात पुर परिस्थिती पाहण्यासाठी आले असता म्हणाले.
शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या..! शिंदे गटाकडून निवडणुक आयोगाला पत्र
या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी आपापलं म्हणणं मांडलं. हा संविधानपीठाचा विषय आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कारण, यामध्ये 10 व्या अनुसूचीचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही यावर समाधानी आहोत. आमची बाजू भक्कम आहे. योग्य निर्णय आमच्याच बाजून येईल, असा दावा देखील फडणवीसांनी केला आहे.
मुळ शिवसेना एकनाथ शिंदें की उद्धव ठाकरेंची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
पक्षात राहुन आवाज उठवणं म्हणजे बंड नाही. जर पक्षातील आमदारांना आपला नेता बदलायचा असेल तर त्यात चुकीचं ते काय? असा सवाल विचारत पक्षातून बाहेर पडल्यानंतर कायदा लागू होतो, पण शिंदेसोबतचे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीयेत. असं सांगत यापुर्वी पक्षांतर बाबींमध्ये कोर्टाचा हस्तक्षेप नव्हता जर संबंधित पक्षातला एखादा नेता बहुमताच्या जोरावर आपल्या नेत्याला आव्हान देऊ इच्छित असेल तर त्याला पक्षांतर बंदी कायद्याचा रोख का असावा? असा युक्तिवाद न्यायालयात आज शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी केला.
Read also
- आमची बाजू भक्कम, आमच्याच बाजूने निर्णय लागेल; न्यायालयाच्या सुनावणींवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदेना शपथ दिलीच कशी?
- “तर बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणलं, असंही ते उद्या म्हणतील”
- शिंदे -ठाकरे राजकीय लढाईची सुनावणी पुढे ढकलली ; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी तारीख
- ठाकरे अन् शहांनी चर्चा केल्यानंतर बाहेर आले अन्..; दानवेंनी सांगितला ‘तो’ किस्सा