दिल्ली : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर भाजपसोबत युती केली. एक आठवड्याच्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तरी अद्याप या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या सर्व याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
“माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, परंतु धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडेच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र शिंदे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवले आहे. शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणंं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणुक आयोगाला केली होती. त्यात आता शिंदे गटाकडून दावा केल्याचं पत्र निवडणूक आयोकडे गेले असून त्यावर काय निर्णय घेतील याकडे लक्ष्य आहे.
संजय राऊत तो भगवान है, उनका नाम मत लिजिए! उदयनराजे संतापले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड रद्द करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची केलेली नियुक्ती आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती, त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय, शिंदे सरकारचा बहुमताचा प्रस्ताव आदी बाबींना सर्वोच्च न्यायालयात तीन याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. यानंतर मुळ शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे यांची यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे.
“अजित पवारांनी महाराष्ट्राचा खजिना राष्ट्रवादीसाठी लुटला”; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
गेल्या पंधरा दिवसातील शिवसेनेच्या घडामो़डी पाहिल्यानंतर त्यातून असं वाटतंय की त्यांनी बंडखोरी केली नाही, त्यांनी उठाव केला. सेनेचे भाजपचे एकविचार आहेत. त्यामुळे युती पंचवीस वर्ष टिकली, ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी युतीला लोकांनी कौल दिला. मुख्यमंत्री पदाच्या पायी त्यांनी महाविकास आघाडी तयारी केली. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगतोय की आम्ही सरकार पाडणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे आज अधिक बहुमत आहे. उलट आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री झाला आहे. शब्द पाळला नाही असं म्हणतात. त्यावेळी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. त्यावेळी शिवसेनेशी आम्ही चर्चा केली. बसल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी आतमध्ये जाऊन चर्चा केली. त्यावेळी बाहेर आल्यानंतर आम्हाला डायरेक्ट मीडियांशी संपर्क साधला. त्यानंतर अमित शहा यांनी सह्याद्री गेस्ट हाऊसवरती आम्हाला माहिती दिली. असं भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “इडीकडून राऊतांना पुन्हा नोटीस”; किरीट सोमय्या म्हणाले की, “अब संजय राऊत की बारी है…”
- शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या..! शिंदे गटाकडून निवडणुक आयोगाला पत्र
- मुळ शिवसेना एकनाथ शिंदें की उद्धव ठाकरेंची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “रिक्षावाला, पानपट्टी, वेश्या यांच्यासाठी शिंदे सरकार योजना राबवणार” उदय सामंत
- शिंदे गटातील खासदाराला केंद्रात मंत्रिपद? राज्यात बलात्काराचा गुन्हा, शिंदे म्हणाले..;