मुंबई: पक्ष वाढविण्यासाठी वाटेल ते! अशा पद्धतीने केंद्रातील सत्ताधारी भाजपचा कारभार चालू आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे यांच्यासारख्या भाजपच्या निष्ठावंतांना डच्चू देत घरी बसवले. त्याचवेळी महाराष्ट्रातून पक्षाबाहेरून आलेले नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार तर मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घातली.
हे पण वाचा: शिवसेनेला इशारा देण्यासाठीराणेंना मंत्रिपद नाही, चंद्रकांत पाटील म्हणतात….
हे पण वाचा: सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशी प्रकरणी हसन मुश्रिफांचे चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान
शतप्रतिशतची घोषणा देत दौडत निघालेल्या भाजपची अवस्था पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर काहीशी केविलवाणी झाली आहे. उत्तर प्रदेश व अन्य राज्यांत आगामी काळात होणाऱया निवडणुकांवर लक्ष केंद्रित मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी भाकरी फिरवण्याचा प्रयत्न केला. पण हे करत असताना कॉँग्रेसमधून भाजपात आलेले नारायण राणे, ज्योतिरादीत्य शिंदे, राष्ट्रवादीतून आलेले कपिल पाटील, भारती पवार यांच्यासारख्या आयात नेत्यांना मंत्रीपदाची बक्षीसी देत निवडणुकांच्या तोंडावर अन्य पक्षातून येणाऱयांसाठी पुन्हा एकदा पायघडय़ा घातल्या आहेत.
हे पण वाचा: भोसरी जमीन आर्थिक घोटाळा : एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
हे पण वाचा: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे
भाजपच्या विचारसरणीशी काहीही संबंध नाही किंवा ज्यांना संघ परिवाराशी काहीही देणे घेणे नाही, अशा अनेकांना भाजपने पक्षात घेऊन सत्तेच्या परिघात बसवले आहे. विचारापेक्षाही मॅन, मनी आणि मसल पावरचे भाजप श्रेष्ठींना महत्त्व वाटू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हे पण वाचा: जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
जातीय समीकरण साधण्याचा प्रयत
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राणेंना भाजपकडून कॅबीनेट मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. वंजारी समाजाचे भागवत कराड आणि आगरी समाजातून येणारे कपिल पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देऊन ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारती पवार यांना मंत्रीपद देऊन केंद्रात महाराष्ट्रातील आदीसावासी समाजाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.