मुंबई: राज्यातील साखर कारखाने हे आर्थिक अडचणीत असल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून साखर कारखान्यांची विक्री केली आहे. असे असताना राजकीय आकांक्षेपोटी भारतीय जनता पक्षाकडून कारखान्यांची एडीमार्फत चौकशी लावावी अशी मागणी होत आहे. मात्र ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले आहेत त्या संचालकांची चौकशी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावावी अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
हे पण वाचा, ‘‘नितीन गडकरींचे कारखाने योग्य पद्धतीने चालू आहेत’’; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव
साखरेचे दर व द्यावी लागणारी उसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने कोट्यवधींच्या आर्थिक तोट्यात गेलेले आहेत. परिणामी राज्य बँकेचे कर्ज थकीत गेले आणि बँकांनाही अडचण येऊ लागली. बँकेचा एनपीए वाढल्याने नाईलाजाने बँकांना साखर कारखाने विकण्याशिवाय पर्याय नसतो. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने विकले आहात त्यांची किंमत करून प्रसिद्धी माध्यमातून निविदा काढून ज्यांची जास्त बोली आलेली आहे त्याच उद्योगसमूहांना हे कारखाने विकले गेलेले आहेत असे असताना केवळ राजकारण म्हणून यामध्ये घोटाळे आहेत.
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विक्री झालेल्या म्हणजेच सर्व ५४ कारखान्यांची चौकशी लावणार असल्याचे म्हटले होते. आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ चौकशी लावावी. या सगळ्या व्यवहारांचे दूध का दूध आणि पाणी का पाणी यापूर्वीच झालेले आहे तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झालेली आहे. माजी न्यायाधीशांनी देखील याबाबत चौकशी केलेली आहे. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कारण नसताना नको ती प्रकरणे उकरून काढू नयेत. ज्या कारखान्यांच्या संचालकांनी कारखाने तोट्यात घातलेले आहेत त्यांची वास्तविक पाहता चौकशी करणे गरजेचे आहे असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
हे पण वाचा,
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, ओबीसींसाठी का दिला जात नाही?
“फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडविते, भाजपचा खरा चेहरा उघड”
धक्काबुक्की, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात, सचिन सावंत यांची भाजपवर टीका