मुंबई : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागून राहिलेल्या बहूप्रतिक्षीत अश्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव मंजुर होत असताना अभूतपूर्व गोंधळ झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.
उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, ओबीसींसाठी का दिला जात नाही?
दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली असून, या घटनेनंतर या सर्वच्या सर्व निलंबित आमदारांनी राज्यपालांसमोर, पत्राद्वारे वस्तुस्थिती मांडली आणि दाद मागितली. आता हे सर्व आमदार या निर्णयाविरुद्ध उच्च नायायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडविते, भाजपचा खरा चेहरा उघड”
यावर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “काल राज्य सरकारची वेगळ्या प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू होता. पण विरोधकांचं, “केलं तुका, झालं माका” असं झालं. ते आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
धक्काबुक्की, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात, सचिन सावंत यांची भाजपवर टीका
आज सकाळी राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी, “भाजपच्या १२ आमदारांचं जे वर्तन काल होतं, ते सगळ्यांनी पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. ते वेलमध्ये गेले. तालिका समितीचे अधक्ष भास्कर जाधवांना त्यांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. त्यामुळेच त्यांचं निलंबन झालं. ते जर झालं नसतं तर, आपण पाकिस्तानच्या संसदेत, यूपी-बिहारमध्ये सभागृहात दंगली होताना पाहिल्या आहेत, तश्या महाराष्ट्राच्या विधानसभेत झाल्या असत्या, पण ही महाराष्ट्राची परंपरा नाही आणि असे पुढेही होऊ नये, म्हणून हा कठोर निर्णय घेतला असेल,” असे सांगून त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
Read Also :
- भाजपाने भरवली प्रतिविधानसभा; फडणवीसांनी मांडला धिक्कार प्रस्ताव
- भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले
- “हे अधिवेशन राज्याचं नसून, केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे”
- भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?