मुंबई : १२ आमदारांच्या निलंबणाच्या निषेधार्थ भाजपचं राज्यभर आंदोलन सुरु आहे. भाजपचे बडे नेते विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसूल आंदोलन सुरू केले आहे. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीस, विखे पाटील, चंद्रकांत पाटलांसह अनेक आमदार पायऱ्यांवर बसून आहे.
अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक, भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर चर्चा होणार
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
ओबीसी आरक्षणाच्या प्रस्तावावेळी गदारोळ करणाऱ्या आणि असंसदीय वागणूक करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन भास्कर जाधव यांनी केलं. महाविकास आघाडीचे १२ आमदार राज्यपालांनी रोखून धरले, त्याचा बदला जाधवांनी १२ आमदार निलंबित करुन घेतला, अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं वागणं तालीबानी वागणं, असल्याचा हल्लाबोल केला. अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.
Read Also :
- देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले
- “हे अधिवेशन राज्याचं नसून, केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे”
- भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?
- “हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा”, चित्रा वाघ यांचा इशारा
- “लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध”, “हिटलरशाही नही चलेगी”च्या नाऱ्यांनी दणाणला विधानसभेचा परिसर