मुंबईतील नालासोपारामध्ये महिलेवर घरात घुसून बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घटली. याप्रकरणावर नाराजी व्यक्त करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आहे का सरकारचं लक्ष या घटनांकडे? कधी आणताय ‘दिशा कायदा’असा सवाल त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीला केला आहे.
,नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका भाजीविक्रेत्या महिलेवर तिच्या राहत्या घरात घुसून अत्याचार केला. या महिलेचा पती रिक्षाचालक आहे. गुरुवारी महिलेचा पती मीरा भाईंदर येथे रिक्षात सीएनजी भरण्यासाठी गेला असताना महिला घरात एकटी असल्याची संधी साधत नराधमांनी महिलेवर अतिप्रसंग केला. घटनेननंतर आरोपींनी तेथून पळ काढला.या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत ३ आरोपीना अटक केली असल्याची माहिती नालासोपारा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी दिली. आज या तीनही आरोपीना वसई न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींचा पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यांनी यासंदर्भांत ट्विट करत राज्यसरकावर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की,” हरामखोरांनी महिलेवर घरात घूसून सामुहीक लैंगिकअत्याचार केलाय आणि हे रोजचं चाललयं कधी चालत्या गाडीत कधी जंगलात खेचून नेऊन एव्हढी नराधम विकृतांची मजल पोहोचली आहे. सरकारचं या घटनांकडे लक्ष आहे का ? किती अंत पाहणार आहात आमच्या सहनशीलतेचा,कधी आणताय ‘दिशा कायदा’पुन्हा पुन्हा विचारतोय’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.