मुंबई : जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत विचारलं असता आतमध्ये बैठक सुरु असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक सुमारे एक तासाहून अधिक वेळ बैठक सुरु चालली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली.
या भेटीबद्दल संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी एकदम खरमरीत प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत विचारलं असता आतमध्ये बैठक सुरु असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस म्हणतात.. मोदी- ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर…..
- नवनीत राणांची खासदारकी धोक्यात; अमरावती आनंदराव अडसूळ विरुद्ध सीमा सावळे लढत होणार का?
- ‘बीड पॅटर्न’ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातही लागू करा – अजित पवार
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
- उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट… दिल्लीतील पत्रकार परिषदतीचे महत्वाचे मुद्दे…