मुंबई : शिवसेना नेते उदय सामंत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. नारायण राणे टिका करतात तेव्हा तेव्हा आमची मत वाढतात असा टोला सामंतांनी लगावलाय. काल साधू हत्याकांडप्रकरणी आमदार राम कदम यांना अटक केल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती.
शिवसेनेने हिंदुत्व सोडल असून शिवसेनेचे हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली होती. त्यावर उदय सामंत यांनी भाजपचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. राणे जेव्हा आमच्यावर टीका करतात तेव्हा आमची मतं वाढतात असे सामंत म्हणाले.
दरम्यान आज ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, त्यांच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. सरकार एकटे चालवू शकत नाही, शेतकऱ्यांचे दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, धर्माचे रक्षण करू शकत नाही, विकास करू शकत नाही.. मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?” असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा