देशासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. खासकरून मुंबईमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. धारावीमधील झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. मात्र राज्य सरकारने पावले उचलत यावर नियंत्रण मिळवले. आता राज्य सरकारच्या या धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) देखील दखल घेत, कौतुक केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी धारावी मॉडेलवरून सरकारचे कौतुक केले. धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले, असे ग्रेबेयेसुस म्हणाले.
"In 🇻🇳🇰🇭🇹🇭🇳🇿🇮🇹🇪🇸 & 🇰🇷 & even in Dharavi, a densely packed area in Mumbai, a strong focus on community engagement & the basics of testing, tracing, isolating & treating all those that are sick is key to breaking the chains of transmission & suppressing the virus"-@DrTedros
— World Health Organization (WHO) (@WHO) July 10, 2020
टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हणाले. “जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. मुंबईतील गजबजलेले ठिकाण असलेले धारावी, जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगिकरण करणे हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे,”