मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणावर भाजमधून पडसाद उमटत असतानाच भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. शिवसंग्रामचे नेते, आमदार विनायक मेटे यांनीही पंकजा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कौरव कोण आणि पांडव कोण याचं मूल्यमापन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतील, असं सूचक विधान विनायक मेटे यांनी केलं आहे.
हे पण वाचा: “पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
तसेच त्यांनी पंकजा मुंडे आणि भाजपमधील संघर्षावर भाष्य केलं. पंकजा मुंडे यांनी काय विचार करायचा, काय नाही करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रसंग पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये निर्माण झाले आहेत. त्यांनी कौरव किंवा पांडव असं भाष्य केलं. त्याचं योग्य मूल्यमापन भाजप, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील करतील, असं मेटे म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यावर काय भूमिका ही त्यांनाच माहीत. पंकजाताईंनी ही भूमिका का घेतली हे त्याच सांगतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी आणि भाजप नेते अमित शहा हे समर्थ आहेत, कुणाला काय द्यायचं हे ते सांगतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा: पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
शिवस्मारकाचा मुद्दा महत्वाचा आहे. शिवस्मारकाच्या ऑफिसची दुरावस्था झाली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. कोर्टाने तोंडी स्थगिती दिली आहे. पण ऑफिसची पडझड झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, असं मेटे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या संध्याकाळी ५ वाजता बैठक बोलावली आहे. त्यात काही तरी ठोस निर्णय होईल अशी आशा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा: मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
१५ मागण्यांवर आज बैठक
मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या आसपासच्या लोकांनीच त्यांना चुकीची माहीती दिली आहे. समाजाचा मनात सरकारविरोधात रोष आहे. सरकारच्या नाकर्तेपणाने आरक्षण टिकलं नाही. आता ज्या इतर मागण्या आहे, त्यांच्यासाठीही उद्या ४ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. एक तास ही बैठक चालेल. या बैठकीत १५ मागण्या करण्यात आल्या आहे. त्या पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे आमचाही मार्ग मोकळा होईल, असं आवाहन त्यांनी केलं.