कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात, खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने, तब्ब्ल १५० च्या आसपास नाराज मुंडे समर्थकांनी आपले राजीनामे दिले होते. भाजपत सातत्याने मुंडे भगिनींना डावलले जात असल्याची तीव्र भावना समर्थकांत पसरली होती.
“तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ”, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चिमटे
दरम्यान, मंगळवारी या नाराज समर्थकांसोबत घेतलेल्या बैठकीत अखेर त्यांनी पंकजा मुंडे यांनी, आपली भूमिका स्पष्टपणे सर्वांसमोर मांडली. यावेळी त्यांनी आपण घर सोडणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही सोडून देणारा नाही, आपल्या मुंडे साहेबांचा हा पक्ष आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं आहे,” असं सांगत नाराज समर्थकांचे राजीनामे नामंजूर केले.
त्यांच्या या झंझावाती वक्तव्यांनंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “गोपीनाथ मुंडेंनी भाजप रस्त्यावर आणली. कार्यालयात काम करून भागणार नाही, रस्त्यावर उतरलं पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला, संघर्ष केले. राज्यात संघटना म्हणून पक्षाला ओळख निर्माण करून दिली, अशा संस्कारात आणि घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत,” असं वक्तव्य केलं आहे.
सूत्र : प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
दुसरीकडे कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी, “मी राष्ट्रीय नेता आहे. माझे नेते जे.पी. नड्डा, अमित शहा, नरेंद मोदी आहेत, असे सांगत, अप्रत्यक्षपणे राज्य नेतृत्वावर नाराजी आणि टीका केली. “मला सत्तेची, पदाची लालसा नाही, मोठ्या नेत्यांना त्याग करावा लागतो. मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही, यायचे कारण माझे कार्यकर्ते आहेत. मला संपवण्यासाठी आणि दबावंत्रासाठी ही जागा पुरणार नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
Read Also :
- कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
- “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
- मोठी बातमी : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?
- “३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
- “निवडणुका एकटेच लढणार आहात का? निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा”