मुंबई: कोण राजे? एक छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर मी दुसऱ्या कुठल्याही राजांना ओळखत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी या राजांच्या मागे धावू नका. मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा खासदार संभाजी राजे छत्रपतींवर केली.
हे पण वाचा: मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
हे पण वाचा: ईडीच्या कारवाईनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; देशमुख म्हणतात…
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनमध्ये शुक्रवारी बैठक झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी संभाजी राजे छत्रपती यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य बनविले. शिवाजी महाराज एकटे होते, तरी त्यांनी स्वराज्य स्थापन केले. आपण सुमारे पाच कोटी आहोत, तरीही आपल्याला आरक्षण मिळत नाही. आरक्षण मिळविण्यासाठी कशाला कोणत्या राजाची आणि महाराजाची वाट पाहता? असेही वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले.
हे पण वाचा: मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
हे पण वाचा: अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राणेंनी तोंड सांभाळावे
छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका करण्याइपत नारायण राणे मोठे नाहीत. छत्रपतींवरील टीका मराठी समाज खपवून घेणार नाही. संभाजी राजे यांनी मराठा आंदोलनाला योग्य दिशा दिली आहे. ते राजकीय अजेंडा आंदोलनात आणत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या मागे मराठा समाज मोठ्या संख्येने उभा आहे. हे सहन होत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अंकुश कदम यांनी व्यक्त केली आहे.